राज्य

रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार

रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार

रसुलाबाद च्या सरपंचांचा सैनिक कल्याण विभाग मार्फत सत्कार

रसुलाबाद येथील सरपंच राजेश सावरकर हे माजी सैनिक असुन त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या 5 वर्षच्या कारकीर्द मध्ये अनेक उल्लेखनीय कार्य केले असल्याने व त्यांना नुकताच अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने ग्रामरत्न पुरस्काराणे सन्मानीत करण्यात आले होते त्यांच्या कार्याची दखल घेत *शौर्य दिनी (सर्जिकल स्ट्राईक dini)* त्यांना अप्पर जिल्हाधिकारी वर्धा, विधी व न्याय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा तसेच सैनिक कल्याण अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्या हस्ते शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

राजेश चंपतराव सावरकर सरपंच रसुलाबाद यांनी यांच्या कार्यकाळात गावाला *स्वच्छता ग्राम पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार* हे पुरस्कार गावाला मिळून दिले. त्यांनी कोरोना काळात गावासाठी महत्वाची भूमिका निभावल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत संवाद साधला होता. ते रुग्ण सेवक सुद्धा आहे, बरेच रुग्णांना रक्त दान करणे, हार्ट, कॅन्सर च्या रुग्णांना त्यांच्या डॉक्टर प्रशांत सावरकर यांच्या मदतीने AIIMS हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट ऑपरेशन करता.
जिल्हा परिषद शाळेसाठी उल्लेखनीय कार्य म्हणजे जिल्हा परिषदची 1 ते 8 ची शाळा त्यांनी वर्ग 9 व 10 केली आणि ग्रामपंचायत हे इयत्ता 9 व 10 चे वर्ग हे ग्रामपंचायत चालवते.
हा सत्कार त्यांनी त्यांचा परिवार, त्यांच्या गावाकऱ्यांना, त्यांच्या गुरुजणांना समर्पित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button