राज्य

पहलगाम हल्ल्याचा आर्वी शहरात तीव्र निषेध:

भारतीय जनता पार्टी व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढून वाहिली श्रद्धांजली

पहलगाम हल्ल्याचा आर्वी शहरात तीव्र निषेध:
भारतीय जनता पार्टी व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढून वाहिली श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल 2025) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आर्वी शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा यांसह अनेक राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे. या क्रूर हल्ल्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) आर्वी, रोटरी क्लब , रेड क्रॉस सोसायटी, तालुका पत्रकार संघटना आर्वी,मातृ सेवा संघ व इतर महिला व पुरुषांनी सायंकाळी कॅन्डल मार्च काढून मृतांना श्रद्धांजली वाहिली.


कॅन्डल मार्च आणि निषेध सभा
भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आर्वी शहरातील विश्रामगृह येथून शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक पर्यंत कॅन्डल मार्च काढला. या मार्चमध्ये आमदार सुमित वानखेडे, विधानसभा आमदार दादाराव केचे, अनिल भाऊ जोशी, डॉक्टर अरुण पावडे,शेकडो नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले. हातात मेणबत्त्या घेऊन सहभागींनी दहशतवादाविरोधात घोषणा देत हल्ल्याचा निषेध केला. मार्चनंतर आयोजित सभेत मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.हा हल्ला केवळ पर्यटकांवरच नाही, तर देशाच्या एकतेला आणि अखंडतेला आव्हान देणारा आहे.

शहरातील नागरिकांमध्ये या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button